Friday, 23 November 2018

आयोध्येतील राममंदिर : शिवसेनेची तिरकस चाल


           आयोध्येतील राममंदिर : शिवसेनेची तिरकस चाल

शिवसेनेच्या  दसरा मेळाव्यात सत्तेतील आपल्या सहपक्षावर म्हणजे भाजपवर जोरदार टीका करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता. आत्तापर्यंत दसरा मेळाव्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर शिवसेनेचे नेतृत्व टीका करत होते. परंतु यावर्षी सत्तेतील मित्र भाजपवर ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. भाजपने आयोध्येत राममंदिर उभारण्याचे दिलेले आश्वासन जुमलेबाजी आहे काय, असा उद्धव ठाकरेंनी सवाल केला.  राममंदिर जुमला आहे हे जाहीर करा असे भाजपला आव्हान देत ठाकरे यांनी परवा  २५  नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे. मंदिर बनाऐंगे लेकीन तारीख नही बतायेंगे, मग मंदिर बांधायला सुरूवात कधी करणार ? ज्यांनी बाबरी पाडली, त्यात अनेक कारसेवक मारले गेले, त्यांच्या बलिदानाची किंमत ठेवा. म्हणून मी अयोध्याला जाणार आहे, से  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदूना घेऊन मंदिबांधू. हिंदू कोणाच्या मालकी-हक्काची प्रॉपर्टी नाही, से आव्हान त्यांनी भाजपला दिले. यावर भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले  आहे.  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरूभाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांवर टिका केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर त्यांना असे मुद्दे आठवतात असे सावंत यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे खरे वाटते. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक प्रश्न बाहेर काढला जातो. आगामी निवडणुकानंतर सत्तेत आपल्याला जागा अधिक मिळाव्यात, अशी शिवसेनेची आत्तापासूनच रणनीती दिसत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपवर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाही.  महाराष्ट्रात भाजपपेक्षा जास्त जागा मिळवणे, हे शिवसेनेचे उद्दिष्ट दिसत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपवर  महागाई आदी मुद्द्यांवरून तोंडसुख घेतानाच राममंदिराचा अडचणीत आणणारा मुद्दा शिवसेनेने बाहेर काढला आहे. मध्य प्रदेशात सध्या लोकांची भाजपवर नाराजी आहे. त्यातच काही उच्च जातींची मते आकर्षित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या  भेटीमुळे भाजप राम मंदिराबाबत ठोस निर्णय घेत नाही,से मतदारांना वाटून त्याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.                                                                                                                                                                                       देशात एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे,  सत्ताधाऱ्यांच्या मनमानीबद्दल शिवसेनेने सुरुवातीपासूनच आवाज उठवला आहे. पण आता  राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सरकारविरोधात बोलत आहे. दसरा दिनी संघ आणि भाजपचा सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेनेने सत्ताधारी भाजपला कानपिचक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत, त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे. शेजारच्या कर्नाटक सरकारने  दुष्काळ जाहीर केला, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही  धमक का दाखवत नाहीत, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. सरकार महागाई रोखू शकत नाही. अत्याचार रोखू शकत नाही.  कलम ३७० रद्द करा, अशा  मागण्याही  शिवसेनेने शिवाजी पार्कवरील मेळाव्यात  केल्या. लोकसभेत हा ठराव आणला तर शिवसेना भाजपच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहील, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, आम्ही लोकांना भरमसाठ आश्वासने दिली होती, कारण आम्हाला वाटले होते की, आम्ही निवडून येणार नाही. गडकरींच्या या बोलण्याला ठाकरे यांनी  निर्लजपणा, कोडगेपणा म्हटले आहे. मी टू बद्दल पंतप्रधान मौन की बात करीत आहेत, हे  गंभीर असून याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे. निर्भयाचे आरोपी अजून लटकले नाही. कोपर्डीचं काय ? असा सवालही ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काय, शेतकऱ्यांबद्दल सरकार मौनात आहे. या सर्व विषयांवरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे, त्यामुळे निदान महाराष्ट्रात का होईना शिवसेना भाजपवर विविध आरोप करून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.  खरे तर शिवसेनेचे बोट पकडून भाजपा महाराष्ट्रातील राजकारणात आला आहे. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा पटकावल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात गेली ३०वर्षे राजकारण करणारा शिवसेना पक्ष अस्वस्थ झाला होता. परंतु मोदी सरकारने लोकांना भरमसाठ आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली नाहीत. तसेच वाढती महागाई सरकार कमी करू शकलेले नाही. लोकांच्या या असंतोषाचा राजकीय फायदा घेण्याची राजकीय चाल शिवसेना खेळणार असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन केले होते. भाजपला शक्य तेवढी कोंडी करत अडचणीत पकडण्याचे तंत्र शिवसेना राजकारणात वापरणार आहे. आता उद्याच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आयोध्येट असतील. ते राममंदिर प्रश्नी अनेक व्यक्तीच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यांना जिथे सभा होती, त्या मैदानावर कार्यक्रम घेण्यास उत्तरप्रदेश राज्य सरकारने मज्जाव केला आहे; परंतु ते आयोध्येचा मुद्दा लोकांसमोर मांडणार आहे. आयोध्या प्रश्नी आपणच कसे आग्रही आहोत, यासाठी शिब्वासेनेची धडपड चाललेली दिसत आहे. हा भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. मज्जाव  लोकसभा व विधानसभा निवडणूक होईपर्यंत ही राजकीय व्यूहरचना जनतेला पाहायला मिळेल. शिवसेनेने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही राजकीय चाल सुरु ठेवल्याचे म्हणता येईल.   



No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर